“सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचाच मुख्यमंत्री बसलाय आता 2029 मध्ये..”, बड्या मंत्र्याचा इशारा कुणाला?

“सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचाच मुख्यमंत्री बसलाय आता 2029 मध्ये..”, बड्या मंत्र्याचा इशारा कुणाला?

Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचं एक (Nitesh Rane) वक्तव्य सध्या चर्चेत आहे. धाराशिव येथे नुकताच भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना मंत्री राणे यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या वक्तव्याने विरोधी महाविकास आघाडीला इशारा मिळाला आहे तर सत्ताधारी महायुतीत मात्र अस्वस्थता वाढली आहे. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा असे वक्तव्य नितेश राणे यांनी या मेळाव्यात केलं.

राणे पुढे म्हणाले, 2029 मध्ये सगळे आमदार भाजपचेच निवडून आले पाहिजेत. कुणी कितीही ताकद दाखवली किंवा कुणी कसेही नाचले तरी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राज्यात देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री आहेत हे लक्षात ठेवा. यानंतर त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष असतेच, म्हणूनच जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाली आहे असा टोला मंत्री राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला लगावला.

Video : नितेश राणेंच्या खात्याला फडणवीसांचा बूस्टर; रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार

जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेते धुसफूस सुरू आहे. शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेतील नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. महायुतीचं सरकार असतानाच स्थगिती दिली गेल्याने विरोधकांनी टीका सुरू केली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतरच स्थगिती दिली गेली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी केलेले वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

ठाकरेंच्या युतीवर राणेंचा खोचक टोला

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचा विचार करून उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या संभाव्य युतीवर नितेश राणे यांनी तुळजापुरात खोचक टीका केली. ते एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी आम्हाला झोप लागत नाही. एकाकडे 20 आमदार आणि एकाकडे शून्य. एवढी यांची ताकद आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत आम्हाला घाम फुटलाय असा टोला मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी लगावला.

Mahayuti Disputes : खात्री करूनच वक्तव्ये करावी, योगेश कदमांची बाजू घेत उदय सामंतांनी नितेश राणेंना फटकारले !

follow us
  • fb
  • instagram
  • youtube